Tuesday, February 13, 2018

वाडा चिरेबंदी

"आमच्या सात पिढ्यानी बसून खाल्लं तरी काय कमी पडायचं नाय! माज्या सुबरावला कुठं बँरीस्टर करायचा हाय!" असं जेव्हा मिशांना पीळ देत बापू म्हणायचा तेव्हा मला सात पिढ्या हि काय भानगड असावी ते नक्की कळायचं नाय. आमच्या लहानपणी बघावं तेव्हा रिकामं टेकड्या लोकांचा बापूच्या तीस खणी वाडयात राबता असायचा. बापू पान खाऊन पिंकदाणीत पिचकाऱ्या मारत अनेक पराक्रमाच्या गोष्टी सांगायचे. बापूचा वाडा गावाच्या मध्यभागी. वाड्याला भली मोठी दगडी चौकट. तितकाच उंचीचा कोरीव दरवाजा. जुन्या तटवजा भिंती. गावाच्या मध्यभागी उंचीवर हा दिमाखात वाडा उभा. वाड्याच्या बाहेरून घसरणीला लागलेलं सगळं गाव दिसायचं. एका महापुरात याच तीस खणी वाड्यानं साऱ्या गावाला आसरा दिलेला. वाड्याच्या बाहेर मोठा दगडी कडेपाट बांधलेला. या कडीपाटाला कधीकाळी बापूचा घोडा बांधलेला असायचा. जग, माणसे कितीही काळासोबत पुढं गेली तरी बापू अजूनही त्याच इतिहास काळात.

पूर्ण कथा वाचा पुस्तक रुपात.....


©ज्ञानदेव पोळ
प्रातिनिधिक फोटो, Credit Indian Frame

No comments:

Post a Comment